कृषी क्षेत्रात नोकरीच्या असंख्य संधी उपलब्ध : अरुण आदलिंगे

Spread the love

वाई : शाळा आणि मळा यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी आता पालक आणि शिक्षकांवर आली आहे. विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी कृषी शिक्षणाची निवड करावी. कृषी क्षेत्रामध्ये नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याचे प्रतिपादन कृषी तज्ञ अरुण आदलिंगे यांनी केले.

वाई तालुक्यातील बाळासाहेब पवार हायस्कूल, उडतरे या विद्यालयातील इयत्ता दहावीच्या शुभचिंतन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक चिंतामणी काटवटे (आयटीआय निदेशक सातारा) होते. यावेळी श्री. धनंजय हेंद्रे (उपनिदेशक आयटीआय सातारा ) यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. आदलिंगे म्हणाले, मुलांनी नाचण्याकडून वाचण्याकडे आले पाहिजे. ज्याप्रमाणे वसंत ऋतू आल्यावर प्रकृती सुधारते त्याप्रमाणे महान संतांची चरित्रे वाचनात आल्यावर संस्कृती सुधारते. देशाप्रती कर्तव्य भावना जपली पाहिजे असेही त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय मनोगतात प्रा. चिंतामणी काटवटे यांनी आयटीआय क्षेत्रातील नवीन कोर्सेस आणि उपलब्ध नोकरीच्या संधी याविषयी माहिती दिली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. पाहुण्यांचे स्वागत व परिचय ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती त्रिवेणी पुजारी यांनी करून दिला. प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. दादासाहेब बनसोडे यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु, अंजली बाबर हिने केले तर स्वागत कु. अंकिता पवार हिने केले. यावेळी श्री. शंकर दगडे, सौ. शिंदे तसेच विद्यालयातील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. दहावीतील विद्यार्थी साईराज खरात याने आभार मानले.

  • Related Posts

    मंत्री मकरंदआबा पाटील यांचे शुभहस्ते पत्रकार दिलीप कांबळे सन्मानित

    Spread the love

    Spread the loveमांढरदेवी तालुका वाई येथील समाजभूषण कै. अशोक दादा जाधव यांच्या जयंतीनिमित्त अशोक जाधव जनकल्याण प्रतिष्ठानच्या वतीने बावधन येथील जेष्ठ पत्रकार दिलीप जिजाबा कांबळे यांना विशेष सामाजिक योगदानाबद्दल समाजभूषण…

    वाई तालुक्यातील उळूंब गावाला जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची गावभेट; ग्रामस्थांबरोबर साधला मनमोकळा संवाद…

    Spread the love

    Spread the loveवाई : बलकवडी धरणासाठी उळूंब ग्रामस्थांना आपल्या जमिनींचा त्याग करावा लागला. इथल्या भूमिपुत्रांना रोजीरोटीसाठी वणवण फिरावे लागत आहे. पुनर्वसनाच्या बाबतीतही अनेक तक्रारी आहेत. निसर्गाचे वरदान लाभलेल्या या भागात…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    गुणवत्तेचा गौरव, यशाचा उत्सव : उत्कर्षचा सभासद पाल्य बक्षीस समारंभ…

    गुणवत्तेचा गौरव, यशाचा उत्सव : उत्कर्षचा सभासद पाल्य बक्षीस समारंभ…

    मंत्री मकरंदआबा पाटील यांचे शुभहस्ते पत्रकार दिलीप कांबळे सन्मानित

    मंत्री मकरंदआबा पाटील यांचे शुभहस्ते पत्रकार दिलीप कांबळे सन्मानित

    वाई तालुक्यातील उळूंब गावाला जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची गावभेट; ग्रामस्थांबरोबर साधला मनमोकळा संवाद…

    धावडी येथील पंचशील बौद्ध विहाराचे ना. मकरंद पाटील यांच्या हस्ते उदघाटन

    धावडी येथील पंचशील बौद्ध विहाराचे ना. मकरंद पाटील यांच्या हस्ते उदघाटन

    माझा लेखन प्रवास

    धावडी येथील उद्योजकांचा, समाजसेवकांचा “धावडीरत्न” पुरस्काराने सन्मान

    धावडी येथील उद्योजकांचा, समाजसेवकांचा “धावडीरत्न” पुरस्काराने सन्मान