कवयित्री शोभा करंडे यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन संपन्न

Spread the love

पुणे : कवयित्री शोभा करंडे यांच्या ‘शोभावतरंग’
या काव्यसंग्रहाचा प्रकाशन समारंभ सदाशिव पेठ येथील राष्ट्र सेवा दलाच्या बॅ.नाथ पै.सभागृहात निळू फुले कला अकादमीचे अध्यक्ष पपीचंद श्रीश्रीमाळ यांचे हस्ते संपन्न झाला. अध्यक्षस्थानी सवंगडी ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा सौ. नीनादेवी देसाई होत्या.

याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक मंदाताई नाईक, सवंगडीच्या सल्लागार उषाताई जोईल, दिलीप धायगुडे, अरुण बुलाख आदी मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रसेवा दल, निळू फुले कला अकादमी आणि एकपात्री कलाकार परिषद, महाराष्ट्र आयोजित ‘गप्पांगण’ या कार्यक्रमाअंतर्गत हे प्रकाशन करण्यात आले.

“कविता ही कविची अंत:स्फूर्ती असून, शोभा करंडे यांची कविता समाज व कुटुंबातील विसंगतीवर भाष्य करत वर्तमानातील अनेक प्रश्नांची उत्तरे शोधते.” या शब्दांत श्रीश्रीमाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगतात सौ. देसाई यांनी कवयित्री शोभा करंडे यांच्या कवितांचा आशय स्पष्ट केला. कवयित्री दीपा पराडकर यांनीही मनोगत व्यक्त केले.

आपल्या मनोगतात कवयित्री करंडे यांनी कविता स्फुरते कशी सांगत अनेकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आणि उपस्थितांचे आभार मानले.

प्रारंभी शैलाताई पाटील, रेखा गुप्ते आणि उर्मिला घाटपांडे यांनी ईशस्तवन सादर केले. कार्यक्रमाचे संयोजन आणि सूत्रसंचालन कवी लक्ष्मीकांत रांजणे यांनी केले.

प्रकाशन समारंभास सवंगडी ज्येष्ठ नागरिक संघाचे तसेच एकपात्री कलाकार परिषद व निळू फुले कला अकादमीचे अनेक मान्यवर उपस्थित होते.

प्रकाशनाच्या आधी ‘ विक्रम वेताळ’ या एकांकिकेचा प्रयोग झाला. यामध्ये लक्ष्मीकांत रांजणे यांच्या अभिनयाची झलक पहावयास मिळाली. पुण्याच्या साहित्यिक वर्तुळात वाईचा लौकिक वाढवण्याचे काम श्री. रांजणे यांच्या माध्यमातून होत आहे.

  • Related Posts

    मंत्री मकरंदआबा पाटील यांचे शुभहस्ते पत्रकार दिलीप कांबळे सन्मानित

    Spread the love

    Spread the loveमांढरदेवी तालुका वाई येथील समाजभूषण कै. अशोक दादा जाधव यांच्या जयंतीनिमित्त अशोक जाधव जनकल्याण प्रतिष्ठानच्या वतीने बावधन येथील जेष्ठ पत्रकार दिलीप जिजाबा कांबळे यांना विशेष सामाजिक योगदानाबद्दल समाजभूषण…

    वाई तालुक्यातील उळूंब गावाला जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची गावभेट; ग्रामस्थांबरोबर साधला मनमोकळा संवाद…

    Spread the love

    Spread the loveवाई : बलकवडी धरणासाठी उळूंब ग्रामस्थांना आपल्या जमिनींचा त्याग करावा लागला. इथल्या भूमिपुत्रांना रोजीरोटीसाठी वणवण फिरावे लागत आहे. पुनर्वसनाच्या बाबतीतही अनेक तक्रारी आहेत. निसर्गाचे वरदान लाभलेल्या या भागात…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    गुणवत्तेचा गौरव, यशाचा उत्सव : उत्कर्षचा सभासद पाल्य बक्षीस समारंभ…

    गुणवत्तेचा गौरव, यशाचा उत्सव : उत्कर्षचा सभासद पाल्य बक्षीस समारंभ…

    मंत्री मकरंदआबा पाटील यांचे शुभहस्ते पत्रकार दिलीप कांबळे सन्मानित

    मंत्री मकरंदआबा पाटील यांचे शुभहस्ते पत्रकार दिलीप कांबळे सन्मानित

    वाई तालुक्यातील उळूंब गावाला जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची गावभेट; ग्रामस्थांबरोबर साधला मनमोकळा संवाद…

    धावडी येथील पंचशील बौद्ध विहाराचे ना. मकरंद पाटील यांच्या हस्ते उदघाटन

    धावडी येथील पंचशील बौद्ध विहाराचे ना. मकरंद पाटील यांच्या हस्ते उदघाटन

    माझा लेखन प्रवास

    धावडी येथील उद्योजकांचा, समाजसेवकांचा “धावडीरत्न” पुरस्काराने सन्मान

    धावडी येथील उद्योजकांचा, समाजसेवकांचा “धावडीरत्न” पुरस्काराने सन्मान